Thursday, January 07, 2010

काही मनातलं......

नाही म्हणालीस तेंव्हां खूप वाईट वाटलं ...
डोळ्यात माझ्या  आसव न्हवती पण मन मात्र फाटलं ....

अजुन तुज्या आठवणी ठेवल्या आहेत जपून ....
जसा खोल समुद्रताल्या शिम्पल्यात मोती रहावा लपून....

सलील

आपली शेवटची भेट अगदी
आता घडल्यासारखी वाटते
पण तू नाही सोबतीला हे जाणवल्यावर
मग हळूच डोळ्यात पाणी दाटते

तुझ्या आठवणीत हरवल्यावर
मला अभिमन्यू झाल्याचा भास होतो
तुझ्या आठवणींच्या चक्रव्यूहात शिरणे सोपं
पण बाहेर पडायला त्रास होतो

कुणास ठावे परत आपले
परत भेटणे व्हावे
आयुष्याचे तुझ्या परंतु
सुंदर गाणे व्हावे



No comments: